अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती - महाराष्ट्र

प्रवाशांच्या हक्कांसाठी लढा, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा ध्यास!

अधिक जाणून घ्या देणगी

लढा सावंतवाडी टर्मिनसचा.. जनतेच्या अपेक्षांचा.. कोकणच्या भविष्याचा..!!

सावंतवाडी टर्मिनसचे भूमिपूजन होऊन २७ जून रोजी ९ वर्षे पूर्ण झाली. आजतागायत हे रेल्वेचे टर्मिनस विविध कारणांमुळे रखडले. हे टर्मिनस सुरू होण्यासाठी येथे पाण्याची सोय, टर्मिनस बिल्डिंग, रस्ता होणे गरजेचे होती परंतु यासाठी गेले ९ वर्षे काहीच हालचाली झाल्या नाहीत. सावंतवाडी शहराला ऐतिहासिक वारसा असून हे शहर पर्यटन शहर देखील आहे, शिरोडा येथील समुद्र किनारा, आरोंदा किरणपाणी, आंबोली हील स्टेशन, रेडी बंदर इत्यादी, येथील पर्यटनाला या टर्मिनस ने नक्कीच चांगले दिवस आणले असते.परंतु टर्मिनस नसल्याकारणाने याचा फटका येथील पर्यटनावर होत आहे. त्यात सावंतवाडी स्थानकातून गेल्या तीन वर्षात राजधानी एक्स्प्रेस, गरीब रथ एक्स्प्रेस आणि नागपूर मडगाव एक्स्प्रेस चा थांबा काढून घेण्यात आला.याचा परिणाम येथील अर्थकारणाला नक्कीच होतोय.त्यामुळे या होणाऱ्या गैरसोयीवर आवाज उठवण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीची स्थापना करण्यात आली. जेणेकरून रखडलेले सावंतवाडी टर्मिनस चे काम परिपूर्ण करून त्याला प्राध्यापक कै मधू दंडवते यांचे नाव देण्यात यावे आणि सावंतवाडी स्थानकाचा दर्जा पुन्हा प्राप्त करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल.

अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती - महाराष्ट्र

कोकणवासियांचा जनआक्रोश..! मग तो महामार्गाचा असो की रेल्वे टर्मिनसचा..!! तो ही स्वातंत्र्य दिनी..!!!

अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती सलग्न संघटनांकडून माणगाव आणि सावंतवाडी येथे आयोजन.
येणाऱ्या स्वतंत्र दिनी कोकणवासिय आपल्यावर होत असणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणार आहेत. वास्तविक बघता कोकणा सारखा निसर्गरम्य परिसर, इथले समुद्र किनारे, येथील धार्मिक स्थळे ही देशात प्रसिद्ध आहे, त्यातच कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा. पण इथले पर्यटन बहरावे असे राज्यकर्त्यांना वाटत नसावे कारण पर्यटनाचा मुख्य गाभा हा दळणवळण आहे. त्यातच महामार्ग आणि रेल्वे हे दोन्ही कोकणातील दळणवळणाची मुख्य साधने.
सध्याची वास्तविकता बघता, मुंबई गोवा महामार्ग हा रत्नागिरी आणि रायगड येथे रखडला आहे. गेली १४ वर्ष हा महामार्ग ह्या नाहीतर त्या कारणाने रखडला आहे. त्यासाठी मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समितीच्या माध्यमातून माणगाव येथे तिरंगा रॅली आणि आमरण उपोषण आयोजित केले आहे.
तसेच, कोकण रेल्वे महामंडळ हे भारतीय रेल्वेचा भाग नसल्याने कोकणवासियांना त्याचा त्रास अधिकाधिक जाणवत आहे. कोकण रेल्वेच्या एकेरी मार्गामुळे गाड्या चालवण्याचा क्षमतेवर नक्कीच बंधने आहेत. फक्त कोकणापुर्ती गाड्या चालवणे हे ही कोकणवासियांची मागणी गेली अनेक वर्षे परिपूर्ण टर्मिनस अभावी पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी तर्फे कोकण रेल्वेचे विलीनीकरण, दुहेरिकरण, आणि परिपूर्ण सावंतवाडी टर्मिनस साठी घंटानाद आंदोलन सावंतवाडी रेल्वे स्थानकात करण्यात येत आहे.

आमचे प्रतिनिधी

सदस्य व्हा

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सदस्य बना आणि आमच्या सेवांचा लाभ घ्या.
आपण सर्वजण एकत्र येऊन आपल्या प्रवासाचा अनुभव उत्तम बनवू शकतो. आमच्या संघटनेचे सदस्य होऊन आपल्याला अनेक विशेष सुविधांचा लाभ घेता येईल. आपल्या समस्यांसाठी आणि प्रश्नांसाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत. आजच सदस्यता घ्या आणि आपल्या प्रवासाचे आरामदायी आणि सुरक्षित बनवा! आपली सदस्यता आमच्या संघटनेला बळकट करेल आणि आपल्याला उत्तम सेवा देण्यास प्रोत्साहन देईल. आपल्यासोबत राहा, एकत्र मजबूत होऊया!

आता सामील व्हा

जनतेचा आवाज

"कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने आमच्यासाठी मोठा आधार दिला आहे. ते खरोखरच आमच्या भल्यासाठी कार्यरत आहेत."

- व्यक्तीचे नाव

"कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने आमच्यासाठी मोठा आधार दिला आहे. ते खरोखरच आमच्या भल्यासाठी कार्यरत आहेत."

- व्यक्तीचे नाव

संपर्क साधा